Tuesday, September 02, 2008


पुर्णत्व

कधी पेटवताना निरांजनातिल वाती
किती जपतो आपण, ओंजळ करतो भवती
झुळुकही जराशी थोपवितॊ हाताने
अन घेतॊ काढून, पुर्ण उजळल्यावरती

एकदा उजळली पुर्णत्वाने ज्योती
की नसते तिजला वाऱ्याचीही भीती
ती स्वत: जळते आणि उजळते इतरा
मग तेच जोडतॊ हात , नी लवतो पुढती
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .

1 comment:

जयश्री said...

क्या बात है रे......!!
खूपच आवडली :)