Saturday, December 10, 2011

मित्र

मित्र जेव्हा खूप वर्षांनी भेटतात
जिथे झाली असते शेवटची भेट
तिथून पुढे सुरु होते मैत्री.. . थेट

मित्र नावाने हाक मारत नाहीत
पाळण्यातल्या गोंडस नावाला झोके देत नाहीत
पक्या, विक्या, राम्या , शाम्या
ते तुमच्या "स्टेटस"ला भीक घालत नाहीत

जुनी भांडणं उकरून काढतात
पण फक्त एक आठवण म्हणून
"तुला ती एक आवडायची नं रे कॉलेजात?"
बायकोसमोरच विचारतात हसून

मित्र काही बोलतातच असं नाही
पाण्यात खडे मारत बसतील तासन तास
सिनेमाची तिकिटं काढून म्हणतील
"चल नं बे, थोडा टाईमपास"

मात्र आपल्या कठीण प्रसंगात
कधी बघावं मागे वळून
मित्र उभे असतील तिथे
मूकपणे, खांद्याला खांदा लावून ...

6 comments:

Deeps said...

cud totally relate to it. gud1

Unknown said...

mast ahe

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

mast ahe

Rajat Joshi said...

छान!

Rajat Joshi said...

छान!